Tuesday 20 August 2013

व्हॉट्सअॅपवर ‘तिरंगा’ का नाही? एक नवा ट्रेण्ड

हाय गुड मॉर्निंग, व्हॉट्सअॅप ब्रो?... व्हॉट्सअॅपवर हा नित्यनेमाने फिरणारा मेसेज. पण गेल्या काही दिवसांपासून या अॅपवर आणखी एक मेसेज फिरत होता तो म्हणजे... 'व्हॉट्सअॅपवर भारताचा झेंडा का नाही? हा प्रश्न फॉर्वर्ड करत रहा... व्हॉट्सअॅपचे प्रशासन जागे होईपर्यंत स्वस्थ बसू नका. १५ ऑगस्टपर्यंत भारताचा झेंडा व्हॅट्सअॅपवर आलाच पाहिजे.' आणि आज १५ ऑगस्ट निघून गेल्यानंतर अझूनही तो मेसेज असाच फिरत आहे.

भारताचा तिरंगा ध्वज व्हॉट्सअॅपवर आणण्यासाठी व्हॉट्सअॅप युझर्सनी हे कुजबुज आंदोलन सुरू केले असून सर्व भारतीयांना एकजुटीचे आवाहन केले आहे. व्हॉट्सअॅप हे अॅप्लिकेशन त्यातील स्टिकर्ससाठी प्रसिद्ध आहे. एखादा संदेश पाठविताना त्याबरोबर त्याला पूरक असलेला स्टिकर पाठवता येतो. स्टिकर्स म्हणजे स्मायली नसुन त्यामध्ये अनेक ऑप्शन्स उपलब्ध आहेत या स्टिकर्समध्ये इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली, रशिया, चीन, जपान, कोरिया व स्पेन या दहा देशाच्या ध्वजांचे स्टिकर्सही आहेत. मात्र, कोट्यावधी युझर्स असलेल्या भारताच्या ध्वजाचा स्टिकर या अॅपमध्ये नाही. त्यामुळे भारतीय व्हॉट्सअॅप युझर्समध्ये प्रचंड नाराजी आहे.

इतर देशांप्रमाणेच भारतीय ध्वजही व्हॉट्सअॅपवर सन्मानाने फडकावा, यासाठी आता कोण्या एकाच्या डोक्यात आलेली कल्पना आता भारतीय अॅप युझर्सनी उचलून धरली आहे. त्याचाच भाग म्हणून 'मेसेज मोहीम' सुरू करण्यात आली आहे. ही मोहिम कोठून सुरु झाली हे पक्के सांगता येणार नाही मात्र अनेकांनी या आंदोलनाला पाठिंबा देत हा मेसेज सर्वच ग्रुपमध्ये पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच प्रत्येकाच्या इनबॉक्समध्ये भारताचा झेंडा व्हॉट्सअॅपवर असावा असा एक तरी मेसेज आजही पडत आहे. काहींनी तर या मोहिमेच्या समर्थनार्थ फेसबुकवरही काही ग्रुप आणि पेजेस सुरू केली आहेत.

भारतीय कायद्यानुसार भारताचा झेंडा वापरण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते, असे काहींचे म्हणणे आहे. मात्र, व्हॉट्सअॅपला कोट्यवधी मिळवून देणाऱ्या भारतासाठी व्हॉट्सअॅप साधी एक परवानगी घेऊ शकत नाही का, असा सवाल काही युझर्सनी फेसबुक पेजेसवर उपस्थित  केला आहे. तर काहींच्या मते झेंडा व्हॉट्सअॅपवर आणणे ही तांत्रिक बाब असून त्याचा इतका बाऊ करु नये असे मत व्यक्त केले आहे.


काहीही असो मात्र लोकांना भारतीय झेंडा व्हॅट्सअॅपवर का हवा आहे याचे ठोस कारण देता येत नाही. तरी अनेकांना हा झेंडा व्हॉट्सअॅपवर हवा आहे. या मोहिमेचे पुढे काय होईल हा मेसेज थेट आता २६ जानेवारीच्या आसपास दिसून येईल असे सध्या चित्र आहे. मात्र तुम्हाला या ट्रेण्डबद्दल काय वाटते प्रतिक्रीया देऊन नक्की कळवा.

Sunday 18 August 2013

कुठे गेले ते व्हिडीओ गेम्स...

माझ्याकडे कालच घेतलेली नवीन कॅसेट आहे तीच्यामध्ये ९,९९९ गेम्स आहेत... अरे यार ती पाचव्या लेवलमधील उडी किती कठीण आहे... नाही रे तो दुसरा दरवाज्याच्यामागे जास्त पॉइण्ट्स आहेत... माझ्या घरी येऊन माझ्याशी खेळताना हायस्ट स्कोअर कर तर मग तुला मानला... मारीयोपेक्षा टॅण्कस्च मस्त आहे...

काही वर्षापूर्वी उन्हाळ्यानंतरही अगदी दिवळीच्या सुट्टीची चाहूल लागे पर्यंत बच्चे कंपनीच्या चर्चेत एकू येणारे हे संवाद सध्या आऊटडेटेड झाले आहेत. त्याएवजी आता फेसबूक, मोबईल अॅप आणि पालकांनी सक्तीने लावलेल्या प्रशिक्षण शिबिराच्या चर्चांनी घेतली आहे.

१९९५ ते २००५ या दहा वर्षाच्या काळात टीव्हीवर खेळता येणा-या व्हिडीओ गेम्सने मुलांवर अक्षरश
: गारुड केले होते. १९९१ नंतरच्या आर्थिक घोरणांत बदल झाल्यामुळे भारतात आलेल्या अनेक गोष्टींपैकी एक म्हणजे टीव्ही व्हिडीओ गेम्स... नव्वदचे दशक संपता संपता हा ट्रेण्ड बाजारात आला. अगदी दीड हाजाराला मिळणा-या मेड इन चायनापासून हजारो रुपयांचे ब्रॅण्डेड व्हिडीओ गेमसेट हातोहात विकले गेले होते. असे एकही घर नव्हते जेथे लहान मुले होती माक्ष व्हिडीओ गेम सेट नव्हता. अनेकांनी तर प्रत्येक वर्षी प्रत्येक सुट्टीसाठी एक याप्रमाणे सर्व प्रकारचे व्हिडीओ गेम्स युझ अॅण्ड थ्रो बेसेसवर वापरल्याचे सांगतात. त्यातील बहुतेक जणांनी बालपणीच्या आठवणीच्या वस्तूमध्ये तो कॅसेटचा स्लॉट असणारा बॉक्स, हाडासारखे दिसणारे कन्ट्रोलर संग्रहित ठेवले आहेत.


उन्हाळ्याची सुट्टी लागली रे लागली की पालकांकडे हट्ट करुन गेमसेट मिळवण्याची परिक्षा मुलांना पार करावी लागत असे. मात्र एकदा का मस्का मारण्यात यशस्वी ठरले तर सुट्टी सुखात जात असे नाही तर आहेतच आपले मित्र ज्यांच्यावर त्यांच्या आईवडिलांची कृपा झाल्याने त्यांना व्हिडीओ गेम मिळालेला असतो. मग दुपारी त्याच्या घरी स्पर्धा लावणे आणि त्यानंतर संध्याकाळी मैदानी खेळ यात सुट्टी कधी संपायची कळतच नसे. या गेमसेटबरोबर मिळालेल्या कॅसेटमधील गेम्स खेळून खेळून कंटाळा आला की नवीन कॅसेटसाठी हट्ट आणि ही कॅसेट घेताना त्यातील गेम्सपेक्षा त्यांच्या रंगाला प्राधान्य देण्यात येत असे. शंभर दिडशे रुपयांना मिळणारी कॅसेट आणली कि पुन्हा नव्या जोमाने टीव्हीसमोर गेम खेळ्याचा उत्साह संचारत असे. मात्र ९,९९९ इन वन असे लिहूनही खेळलेलेचा गेम असल्याचे पाहूण वाईट वाटायचे मात्र हेच कारण देत नवीन कॅसेटचा हट्ट करणे. उन्हाळा संपून शाळा सुरु होईपर्यंत हाच दिनक्रम सुरु असे. जुनच्या दुस-या आठवड्यात शाळा सुरु झाल्यावर सर्व काही नवीन नवीन मिळाल्याच्या आनंदात दिवाळीपर्यंत मारियो आपल्या दोस्तासह कपाटात कायमचा बंद होत असे.

हे गेम्स खेळण्याआधी असणारी अडथळ्यांची शर्यत पार करताना आपण एखादे इलेट्रीशीयन असल्यासारखेच वाटत असे. आईवडिलांना कळणार नाही इतकी वायरींग करता येत असल्याने मुलांची कॉलर एकदम टाइट असे. सर्व वायर्स बरोबर लावणे, एव्ही टीव्हीची सेटींग चेक करणे. गेमचा चार्जर एक्ठेशनने लावणे. वायर अखूड असल्यास खाली उशा, पुस्तके, गेम बॉक्सचे कव्हरचा टेकू देऊन त्याला लाल, पिवळ्या, पांढ-या कलरच्या वायर योग्य जागी जोडणे, पुढे पोर्टल नसेल तर टीव्हीमागून वायरींग करण्यासाठी धडपडणे, ही सर्व सेटींग झाल्यानंतर दिवसभर या सेटअपला धक्क न लावता तिच्या आजूबाजूलाही कोणी फिरकणार नाही याची काळजी घेणे यामध्ये गेम खेळण्यापेक्षा जास्त मज्जा येत असे. महाग गेम असला तर डक हण्टसारखे गेम खेळ्यासाठी दिलेली ती गन वापरण्याचा अनुभव आपल्याला नेमबाज असल्याचा भास होत असे.

मात्र जसे टीव्हीला सोबत करायला कम्प्यूटर आणि मोबाईलने आपले पाय घराघरात रोवले त्यामप्रमाणे या व्हिडीओ गेम्सला घरा आणि मनाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यानंतर रोडररॅशपासून सुरु झालेला गेमचा सपाटा अत्ताच्या अॅग्रीबर्ड्सपर्यंत येऊन पोहचला आहे. त्यामुळेच घरातील टीव्हीवर खेळता येणारे व्हिडीओ गेम पुढच्या पिढीपर्यंत पोहचलेच नाहीत. आज ते व्हिडीओ गेम्स ९०च्या दशकात जन्मलेल्या आणि सध्याच्या तरुणाईच्या कपाटांमध्ये पडून आहेत. तरी फेसबूकवर अधूनमधून या गेम्सची आठवण येत असल्याचे फोटो आणि स्टेटस अपडेट होत असतात. इतकीच काय ती या गेम्सची आजाच्या टेक्नलोजीमधील उपस्थिती. आजची मुले उन्हाळ्यात ऑनलाइन गेम्स खेळता, फेसबूकवर टाइमपास करतात आणि शिबिरांमध्ये अडकून आहेत त्यामुळे त्यांच्यापर्यंत हे गेम्स पोहचणे तसेही शक्यच नाहीय.

हे गेम्स खेळतानाचे जुगाड
> बॉक्स हलणार नाही याची स्पेशल काळजी घेणे
> कॅसेटचे कव्हर तुटले तर फक्त त्या पांढ-या आकृत्या असणा-या हिरव्या चिप वापरुन नवीन कॅसेट मिळे पर्यंत दिवस ढकलणे.
> चीपही चालत नसेल तर ती खोडरबरने साफ करणे(कारण हा प्रिय मित्राचा सल्ला असतो)
> डक हण्ट खेळताना गनमुळे वायर कनेक्शन तुटणार नाही म्हणून टीव्ही स्क्रीनच्या एकदम जवळ जाऊन नेम साधणे.

टॉप गेम्स
> मारीयो
> कॉन्ट्रा
> टँक्स
> ऑलंपिक
> सर्कस
> डक हण्ट

> स्ट्रीट फाइट
> एफ वन रेस
> टेनिस
> फुटबॉल

Friday 16 August 2013

It's E-ndependence day, not Independence Day

I know 15th August is gone. But I had this on my mind since yesterday and I finally got a chance to express what I felt.

So we celebrated Independence Day finally. Not by attending morning march or saluting the Tiranga but by sharing status updates, tagging friends on flag photos, adding India badge on display pictures, changing cover photos etc. I mean to say we celebrated E-ndependence day instead of Independence Day.


My 67th Independence day started with friend tagged me on some Indian flag photo with quote saying Mera Bharat Mahan’ & this was around 12:03 am. Much like celebrating a midnight birthday! So I could guess that was going to be a slim chance for my friend to be there for  flag hosting  early in the morning on college ground. But this midnight independence tag led me thinking.. Oh gosh thanks there was no Facebook in 1947 otherwise imagine what could our history books read like...

‘Sharp at zero hours when rest of the world was in deep sleep first prime minister of India Mr. Jawharlal Nehru stated tagging each & every National Congress man in his status update saying ‘At the stroke of midnight hour, when the world sleeps after Internet slowdown, India will awake to life and freedom. - feeling excited’ within no time it got thousands of LIKES & SHARE. Top trend on Twitter was observed as #indianindependence #birthofthenation. More than thousand twitters were recorder on this historic night. In the morning Nehru posted the YouTube link of his speech from his FB account along with the Tweet at same time.’

Seriously my whole day went just by clicking ‘hide this photo from profile’ option. It seems like it's a half yearly tradition to show Indian patriotism on Social networking. 26th January & 15th August are the most (Online) Patriotic days. We should thank our great grandfather & grandfather’s generation for giving us two opportunities to show our love towards the nation. Most funny part is this wave of Love for motherland doesn’t even last for more than 24 hours. Raat gayi baat gayi.   

As usual tradition goes “UNESCO Chooses Indian National Anthem as Best in the World”, Nation Anthem & National Song (राष्ट्रगीत और राष्ट्रगान) debates were some of the most popular topics of the I-day. Another attraction this year was we want Indian flag on Whatsapp message.


This Online Day celebration trend is not new of us. We have explained how much we love our Father, Mother, Sister, Brother & friend on Father’s day, Mother’s day, Sister’s day, Brother’s day & friendship day respectively. We like to express our love for people who live under the same roof with us on social networking sites. Yeah, it's a strange truth.

While closing this topic as I know there will be not much time you have to read my post some people enjoyed the real I-day offline. The best example was one of my colleagues told me how patriotic he felt when he was offered a special lunch with Tiranga rice, Tiranga Puri & tri color sweets in our pantry as I-day special lunch. (That’s the plus point of being on a job when rest of the country is on a holiday).


I would like to know your thoughts on this E-ndependence day trend do comment & share some E knowledge.